देवळाली प्रवरा नगरपालिकेची घरपट्टी पाणीपट्टी कमी करा : अन्यथा.., प्रहार जनआंदोलन उभारणार - आप्पासाहेब ढूस
देवळाली प्रवरा - ( प्रतिनिधी )
देवळाली प्रवरा नगरपालिकेने मोठया प्रमाणात घरपट्टी मध्ये वाढ केली असुन पाणीपट्टीची सुद्धा अन्यायकारक वसुली सुरू असल्याने तातडीने घरपट्टी पाणीपट्टी कमी करा अन्यथा.. प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने नगरपालिकेच्या विरोधात जनआंदोलन उभारावे लागणार असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ प्रमुख आप्पासाहेब ढूस यांनी नगरपालिकेला दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे .
ढूस यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या मालमत्ता कराच्या बिलाबाबत आपण पत्राद्वारे जी माहिती दिली आहे त्यामध्ये प्यारा क्रमांक दोन मध्ये *चतुर्थ वार्षिक पुनरमूल्यांकन प्रस्तावित असल्याने सन 2023-24 चे अंतिम बिल चतुर्थी वार्षिक पुनर्मल्यांकन नंतर देण्यात येईल* असा शिक्का मारून बिले वाटप करण्यात आले आहे असे आपण म्हटले आहे. तथापि.., माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचे पत्रानुसार व 31 डिसेंबर 2023 ला पुनर्मूल्यांकन पूर्ण झाले असेही आपण 29.10.2024 अन्वये जिल्हाधिकारी यांना कळविले असताना 01 जानेवारी ते 31 मार्च पर्यंत आपण बिलावर मारलेल्या शिक्यांनूसार उर्वरित बाकी वसुली करणे क्रमप्राप्त होते.. मात्र, तसे न करता आपण २०२४- २५ च्या बिलात मागील थकबाकी सदरी रक्कम दाखवून घरपट्टीची बिले वाटप केलेले आहेत.
तसेच.. अशा पद्धतीने शिक्के मारून बिले वाटप करण्याची कायद्यात तरतूद नाही.. आणि, कलम 150 (क) हा नवीन मालमत्तेच्या कर आकारणी संदर्भात असून त्याचा या कर आकारणीशी काही एक संबंध नाही. त्यामुळे आपण दिलेली माहिती दिशाभूल करणारी आहे सबब झालेले पुनरमूल्यांकन बेकायदेशीर झाले असल्याने देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना ते मान्य नाही.. ते तात्काळ रद्द करण्यात येऊन मागील सन 2022-23 च्या आकारणी प्रमाणेच मालमत्ता करायची बिले सर्व नागरिकांना देण्यात यावीत.
तसेच.., देवळाली प्रवरानगर परिषदेने नागरिकांसाठी आठवड्यातील एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे.. त्यामुळे, आठवड्यातून एक दिवस पिण्याचे पाणी येथील नागरिकांना देण्यात येत नाही. अशा पद्धतीने वर्षातील एकूण 48 दिवस पाणी कपात केली जात असल्याने या कपात कालावधी मधील पाणीपट्टी नागरिकांकडून आकारणी करणे अन्यायकारक आहे त्यामुळे 1800 रुपये वार्षिक पाणीपट्टीच्या हिशोबाने पाणी बंद कालावधीतील 48 दिवसांचे एकूण 240 रुपये पाणीपट्टी वार्षिक पाणीपट्टीच्या बिलातून कमी करण्यात यावी.. व, त्या पद्धतीने सुधारित पाणीपट्टी मागणीची बिले नागरिकांना देण्यात यावीत ही विनंती.
तरी आपणास विनंती की, देवळाली प्रवरा नगरपरिषदेची अन्यायकारक वाढ केलेली घरपट्टी व पाणीपट्टी तात्काळ कमी करण्यात यावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने सनदशीर मार्गाने या विरोधात जन आंदोलन हाती घेण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.. अशा आशयाचे पत्र देवळाली प्रवरा नगरपालिकेला देण्यात आले असून त्याची प्रत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चुभाऊ कडू आणि अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments