मुळा धरणातून नदीपात्रात जायकवाडीकडे पुन्हा पाणी झेपावले
राहुरी ( प्रतिनिधी )
नगर जिल्ह्याला संजीवनी ठरलेल्या मुळा धरणातून पुन्हा एकदा नदीपात्रात आज सोडण्यात आले . जुलै आणि ऑगस्टमध्ये सलग दोन वेळा पाणी सोडण्याची ही बहुदा क्वचितच वेळ असावी .
आज सकाळी धरणसाठा पंचवीस टीएमसी वर पोहोचला . धरण परिचारण सूचीनुसार 31 ऑगस्ट पर्यंत पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी अतिरिक्त पाणी मुळा नदी पात्रात सोडण्याचे निर्देश आहेत .
गेल्या दोन दिवसात मुळा धरणात दोन टीएमसी पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली . परिणामी धरण ९५ टक्क्यांपर्यंत भरत आलेले आहे .
आज सकाळी मुळा धरणाकडे पाच हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती , दुपारी ती 4 हजार 421 क्युसेक इतकी होती .
यंदाच्या हंगामात 15 ऑगस्ट पर्यंत धरणात 16 टीएमसी हून अधिक पाणी जमा झालेले आहे . मुळा धरणातून मुळा नदी पात्रात जायकवाडी कडे पुन्हा पाणी झेपावले आहे. जलसंपदा विभागाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .



Post a Comment
0 Comments