Type Here to Get Search Results !

पोलीस स्थापना दिनानिमित्त राहुरीत निबंध स्पर्धेत 30 शाळांच्या 6 हजार विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग



पोलीस स्थापना दिनानिमित्त राहुरी तालुक्यात घेतलेल्या निबंध स्पर्धेत सुमारे 30 शाळांच्या 6000 विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग

राहुरी   ( प्रतिनिधी )


राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने तालुक्यातील शाळांमध्ये व वैद्यपूर्ण अशी निबंध स्पर्धा घेण्यात आली याला मोठा प्रतिसाद शाळांतील विद्यार्थ्यांकडून मिळाला शाळा व्यवस्थापन यांनी देखील यात सहकार्य केले .

यातील निबंधाचे विषय

1)स्मार्टफोन-शाप की वरदान 

2)वाहतुकीचे नियम 

पोलीस विभागामार्फत अनेक गुन्ह्यांचा तपास करताना गुन्ह्याच्या कारक घटकांमध्ये मोबाईलचा दुरुपयोग हा वारंवार दिसून येतो. 


त्यामध्ये अल्पवयीन मुलींचे अपयन असो की लैंगिक अत्याचार, चोरी खून दरोडा असो की ओटीपी विचारून बँकेतील खाते रिकामे केल्याची घटना असो. मेट्रोमोनियल फ्रॉड, स्कूपिंग कॉल, आयडेंटिटी थेप्ट, परसोनिफिकेशन, जॉब फ्रौड अशा विविध गुन्ह्यांमध्ये मोबाईलचा (स्मार्ट फोनचा) खुबीने गुन्हेगारा मार्फत दुरुपयोग केला जातो. 



तसेच सामान्य नागरिकांच्या जीवनामध्येही मोबाईलमुळे बरेच उलथा पालथ होऊ लागलेली आहे.

अगदी लहान लहान विद्यार्थ्यांच्या जीवनावरही त्याचा विपरीत परिणाम दिसू लागलेला आहे. 



स्मार्टफोन हे आजच्या काळात एक महत्त्वाचे साधन बनले आहे, परंतु विद्यार्थ्यांसाठी याचा अतिरेकी वापर घातक ठरतो. शिक्षणासाठी उपयोगी ठरणाऱ्या स्मार्टफोनचा चुकीच्या पद्धतीने आणि अति वापर केल्याने शैक्षणिक, मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. खाली विद्यार्थ्यांवर होणाऱ्या स्मार्टफोनच्या हानिकारक परिणामांचा आढावा घेण्यात आला आहे.





१. शैक्षणिक कार्यात व्यत्यय

स्मार्टफोनमुळे अभ्यासात लक्ष केंद्रित करणे कठीण होते. सतत नोटिफिकेशन येणे, सोशल मीडियाचा वापर, आणि गेम्स खेळणे यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रदर्शन घसरते. यामुळे गृहपाठ आणि परीक्षा तयारीला अडथळा निर्माण होतो.



२. झोपेचा अभाव

स्मार्टफोनचा रात्री उशिरा होणारा वापर झोपेच्या वेळेत व्यत्यय आणतो. निळ्या प्रकाशामुळे (blue light) मेंदूतील झोपेचा हॉर्मोन मेलाटोनिनचे उत्पादन कमी होते, ज्यामुळे विद्यार्थ्यांची झोप अपुरी राहते आणि त्यामुळे थकवा आणि चिडचिड वाढते.





३. मानसिक ताण

सतत सोशल मीडियाचा वापर विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करतो. दुसऱ्यांच्या यशस्वी जीवनशैली पाहून स्वतःविषयी असमाधान वाटते, ज्यामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि नैराश्याची शक्यता वाढते.


राहुरी पोलीस स्टेशन आयोजित पोलीस वर्धापन दिनानिमित्त खालील नमूद शाळांचे विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत सहभाग नोंदवला.

1)संत महिपती विद्यालय तांभेरे 2)कै मथुराबाई विश्वनाथ धुमाळ विद्यालय मुसळवाडी 3)नूतन माध्यमिक विद्यालय देवळाली प्रवरा 4)प्रवरा माध्यमिक विद्यालय गुहा  5)नूतन मराठी शाळा नं 3 वाघाचा आखाडा राहुरी 6)नूतन मराठी शाळा नंबर 5,राहुरी स्टेशन. 7)नूतन कन्या शाळा राहुरी  8)नूतन मराठी शाळा नं. 9 येवलेवस्ती  9)नुतन उर्दु शाळा , न.पा राहुरी   10)नूतन मराठी शाळा क्रमांक दोन जोगेश्वरी आखाडा  11)महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालय वरवंडी  12)माध्यमिक विद्यालय देसवंडी 14)कै. ज. का. पाटील विद्यालय चिंचोली 15)आदर्श माध्य विद्यालय ब्राम्हण

16)श्रीराम माध्यमिक विद्यालय निंभेरे 17)डी पॉल हायस्कूल वावरथ  18)माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कारवाडी  19)शाहू विद्या मंदिर खडांबे ता राहुरी 
20)मुळा व्हॅली पब्लिक स्कूल म्हैसगाव 21) स्वर्गीय नंदकुमार पब्लिक स्कूल देवळाली प्रवरा  22) कॅथोलिक शाला राहुरी 23)मांजरी शाळा
24)न्यू प्रसाद माध्यमिक विद्यालय कनगर 25)कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वांबोरी.  26)श्री केदारेश्वर माध्यमिक विद्यालय , म्हैसगाव 27)श्री संत कदम माऊली माध्यमिक विद्यालय पाथरे खुर्द  28)प्रगती विद्यालय राहुरी 29)संत तुकाराम विद्यालय बारागांव नांदूर  30)प्रवरा माध्यमिक विद्यालय कोल्हार खुर्द 31) भागीरथी कन्या विद्यालय राहुरी

सदर स्पर्धांमध्ये वर्गनिहाय तालुक्यातून विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान 26/01/2025 रोजी कऱण्यात येणार असून प्रथम व द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यास पोलीस स्टेशन राहुरी मार्फत बक्षिसे (ट्रॉफी) देण्यात येणारं आहे.
स्पर्धेचा निकाल तालुका शिक्षणाधिकारी श्री तुंबारे साहेब दिनांक 20/01/2025 पर्यन्त घोषित करतील.




४. शारीरिक आरोग्यावर परिणाम

स्मार्टफोनच्या सततच्या वापरामुळे डोळ्यांवर ताण येतो आणि मणक्याचे विकार उद्भवू शकतात. व्यायामाचा अभाव आणि सतत बसून राहिल्यामुळे लठ्ठपणा आणि अन्य शारीरिक समस्याही उद्भवतात.


५. सामाजिक संवादाचा अभाव

विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष संवाद कमी झाला आहे. स्मार्टफोनमुळे एकाकीपणा जाणवतो आणि मित्रमंडळ, कुटुंबाशी असलेला संवाद कमकुवत होतो, ज्याचा मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

उपाय

 1. स्मार्टफोनचा वापर अभ्यासासाठी मर्यादित ठेवा.

 2. वेळेचे योग्य नियोजन करा आणि निश्चित वेळेसाठीच सोशल मीडिया वापरा.

 3. झोपेच्या दोन तास आधी स्मार्टफोन बंद करा.

 4. प्रत्यक्ष संवाद वाढवण्यासाठी कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवा.


स्मार्टफोनचे फायदे आहेत, परंतु त्याचा अतिरेकी आणि अयोग्य वापर विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी घातक ठरतो. तंत्रज्ञानाचा योग्य प्रकारे आणि मर्यादित वापर करणे हेच विद्यार्थी जीवनातील यशासाठी महत्त्वाचे आहे.

या समस्यांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने

राहुरी पोलीस स्टेशन मार्फत पोलीस स्थापना दिनाच्या औचित्य साधून तालुक्यातील सुमारे 35 शाळांमध्ये गटविकास अधिकारी श्री मुंडे, शिक्षणाधिकारी श्री तुंबारे नगरपरिषद मुख्याधिकारी श्री ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या समन्वयातून सुमारे 6000 विद्यार्थ्यांची

मोबाईल शाप की वरदान

वाहतुकीचे नियम या विषयावर निबंध स्पर्धा घेऊन मुलांना राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, अशोक शिंदे शकूर सय्यद यांनी मार्गदर्शन केले.

सदर जनजागृती पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधून माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments