Type Here to Get Search Results !

नगर जिल्ह्यातील साडेआठ लाख शेतकऱ्यांना भरपाई 📍 अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाचा निर्णय – नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा

 🟩  नगर जिल्ह्यातील साडेआठ लाख शेतकऱ्यांना भरपाई



📍 अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाचा निर्णय – नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा


💬 जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिलेली माहिती



अहिल्यानगर  ( प्रतिनिधी )

👉  यावर्षीच्या अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेती, पशुधन आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

👉  जिल्ह्यातील ८ लाख ४९ हजार ७१६ शेतकऱ्यांना एकूण ₹८८०२३.६६ लाख रुपये (म्हणजेच सुमारे ₹८८०.२३ कोटी) भरपाई मंजूर.

👉  बँकांनी ही भरपाई रक्कम कर्ज किंवा अन्य खात्यात हस्तांतरित करू नये; अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई होणार आहे.


🏠 घरांची पडझड (१ एप्रिल ते ३० सप्टेंबर)

🟢 एकूण – ५,६९७ घरे

🔹 पाथर्डी – १,०२०

🔹 शेवगाव – ९२१

🔹 जामखेड – ९०६

🔹 नगर – ५२२

🔹 नेवासा – ५६५

🔹 राहुरी – ३९६

🔹 संगमनेर – २२७

🔹 राहाता – २०३

(इतर तालुके : अकोले, कर्जत, कोपरगाव, पारनेर, श्रीगोंदे, श्रीरामपूर)


🐄 जनावरे व कुक्कुटधन हानी

🔸 १,०५९ जनावरे दगावली

🔸 १३,८७९ कोंबड्या मृत

🔸 आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू


🌾 ५.७६ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

📍 १४ तालुक्यांतील १,३११ गावांवर अतिवृष्टीचा फटका


📢   “ शेतकऱ्यांच्या पाठीशी प्रशासन ठामपणे उभं आहे. भरपाई वाटप प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ देणार नाही ”

—  डॉ. पंकज आशिया , जिल्हाधिकारी - अहिल्यानगर .

Post a Comment

0 Comments